वारकरी संप्रदायाच्या बदनामी मागील ‘राजकारण’
देशात डावे, पुरोगामी, समाजवादी, मार्क्सवादी, इस्लामवादी आणि मिशनरी चर्च यांची अघोषित युती आहे. ते एकमेकांच्या विरोधात जाणार नाहीत आणि एकमेकांना पूरक मदत करतील ही आधीपासूनच त्यांची योजना. त्यानुसार ते एकमेकांना प्रत्येक घटनेत मदत करताना दिसतात. २०१४ पासून ‘हिंदुत्व’ विचारांचे राजकीय परिवर्तन झाल्यामुळे ही सर्व डावी गँग आधीच विचलित होती. ‘हिंदुत्व’ आणि ‘धर्म’ बदनाम करण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलन आणि आरोप केले. देशात अराजकता निर्माण करण्याचेही प्रयत्न झाले. पण त्याचा परिणाम झाला नाही. मोदी दुसऱ्या आणि तिसऱ्या टर्म मध्येही निवडून आले. महाराष्ट्रात २०१९ च्या निवडणुकीत ठाकरेंना फोडण्यात डाव्यांना यश आले. त्यामुळे महाराष्ट्रातील दुसरी टर्म अडीच अडीच वर्ष आणि पक्ष फुटीच्या वादात गेली. त्यानंतर २०२४ च्या विधानसभेसाठी डाव्यांनी जातीयवादी कार्ड खेळून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. ‘मराठा’ विरुद्ध ‘ओबीसी’ असा वाद पेटवला. आदिवासी, मातंग, वंजारी, धनगर, दलीत यांना चिथावण्याचे काम केले. आता यावेळी ‘हिंदुत्व’ विचाराचे सरकार (महायुती) येणार नाही असे वाटू लागले होते....