पोस्ट्स

Featured post

वारकरी संप्रदायाच्या बदनामी मागील ‘राजकारण’

इमेज
देशात डावे, पुरोगामी, समाजवादी, मार्क्सवादी, इस्लामवादी आणि मिशनरी चर्च यांची अघोषित युती आहे. ते एकमेकांच्या विरोधात जाणार नाहीत आणि एकमेकांना पूरक मदत करतील ही आधीपासूनच त्यांची योजना. त्यानुसार ते एकमेकांना प्रत्येक घटनेत मदत करताना दिसतात.  २०१४ पासून ‘हिंदुत्व’ विचारांचे राजकीय परिवर्तन झाल्यामुळे ही सर्व डावी गँग आधीच विचलित होती. ‘हिंदुत्व’ आणि ‘धर्म’ बदनाम करण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलन आणि आरोप केले. देशात अराजकता निर्माण करण्याचेही प्रयत्न झाले. पण त्याचा परिणाम झाला नाही. मोदी दुसऱ्या आणि तिसऱ्या टर्म मध्येही निवडून आले.  महाराष्ट्रात २०१९ च्या निवडणुकीत ठाकरेंना फोडण्यात डाव्यांना यश आले. त्यामुळे महाराष्ट्रातील दुसरी टर्म अडीच अडीच वर्ष आणि पक्ष फुटीच्या वादात गेली. त्यानंतर २०२४ च्या विधानसभेसाठी डाव्यांनी जातीयवादी कार्ड खेळून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. ‘मराठा’ विरुद्ध ‘ओबीसी’ असा वाद पेटवला. आदिवासी, मातंग, वंजारी, धनगर, दलीत यांना चिथावण्याचे काम केले.  आता यावेळी ‘हिंदुत्व’ विचाराचे सरकार (महायुती) येणार नाही असे वाटू लागले होते....

पहलगाम हल्ला: हिंदूंना शत्रूबोधाची जाणीव करून देणारा दिवस

इमेज
२२ एप्रिल २०२५ रोजी काश्मीर घाटीतील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर इस्लामिक दहशतवाद्यांनी धर्म विचारून केलेला हल्ला, त्याच्या जखमा, वेदना आजही ताज्या आहेत. पहलगाम हल्ल्यातील थरारक चित्र पाहिल्यानंतर आजही तळपायाची आग मस्तकात जाते. २६ भारतीयांची ते केवळ हिंदू आहेत म्हणून निर्घृण हत्या करण्यात आली होती, तर अनेकजण जखमी झाले होते.  पहलगाम हल्ल्यातून केवळ इस्लामिक दहशतवादाचा चेहरा उघड झाला नव्हता, तर इस्लामवाद्याची पाठराखण करणारे घरभेदी सेक्युलर पुरोगामी जमात आणि त्यांचे खोटा धर्मनिरपेक्षतावाडी अजेंडा सुद्धा उघड झाला होता. आज या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाले. त्याच्या वेदना जिवंत असल्या तरी त्यापासून आम्ही काय शिकणार आणि काय लक्षात ठेवणार? हे महत्वाचे आहे.  काही घटना/ प्रसंग जे लक्षात ठेवलेच पाहिजे–  – पहलगाम हल्ला झाल्यापासून पाच दिवसात भारतात वेगवेगळ्या ठिकाणी पहलगाम हल्ल्याचा प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष समर्थन केले म्हणून अनेक जणांवर गुन्हे दाखल झाले होते.  – निषेध आंदोलनात पाकिस्तानचा झेंडा जाळला आणि पाकिस्तानविरोधी घोषणा दिल्या म्हणून विरोध झाला. सामाजिक तेढ व दंगल...

आठवणीतील ‘योगेशभाऊ मानकर’

इमेज
एखाद्या व्यक्तीची सामाजिक, वैचारिक प्रतिमा घडण्यासाठी बालमनावर काही व्यक्तींचा नक्की प्रभाव झालेला असतो. माझ्या बालपणी मनावर प्रभाव झालेल्या अनेकांपैकी एक म्हणजे योगेश भाऊ. योगेश भाऊंचा निर्भीडपणा, धाडसी, करारी स्वभाव माझ्या मनाला बालपणीच भावला होता. बाजार पट्ट्यातील हनुमान मंदिरातील शनिवारच्या आरतीनंतर थोडावेळ राष्ट्रीय विषयावर चर्चा व्हायची. त्याठिकाणी खास योगेश भाऊंना ऐकण्यासाठी मी आवर्जून जायचो. एखाद्या दिवशी योगेश भाऊ आले नाही की मन नाराज व्हायचे. त्यावेळेस संघ, बजरंग दल, हिंदुत्व असे फार काही कळत नव्हते. परंतु ही लोक देशहितासाठी काहीतरी मोठ काम करतात हे लक्षात यायचे. जसजसा मोठा झालो तसा योगेशभाऊ सोबत चांगली ओळख झाली.  एकदा रामनवमी मिरवणुकीत ‘बनाएंगे मंदिर’ गाणे लावले म्हणून पोलिसांनी बँड जप्त केला. अनेक विनंत्या करूनही ते बँड देईना. पोलिस स्टेशनसमोर मोठी गर्दी जमली होती. सामंजस्याची भूमिका घेऊन पोलिस ऐकत नाही हे पाहून योगेशभाऊ आपल्या काही कार्यकर्त्यांसह आत गेले आणि “बँड देता... का आम्ही सामूहिक बनायेंगे मंदिर म्हणू?” असा धमकीवजा इशाराच पोलिसांना दिला. योगेशभाऊंची...

बॉलिवूड बदलतोय..?

इमेज
भारतीय सेलिब्रिटी दुटप्पी, ढोंगी असल्याची सारखी टीका होत असते. विशेषता बॉलिवूड कलाकारांवर हिंदुविरोधी, सेक्युलर असल्याची कायम टीका होते. त्यामध्ये बहुतांशी तथ्य आहेच. परंतु अलीकडील काळात काही परिवर्तन होताना दिसत आहे. देशहितासाठी आणि हिंदूंच्या बाजूने सुद्धा काही कलाकार निर्भीडपणे समोर येऊन बोलू लागले आहेत.  बांग्लादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल नुकतीच अभिनेत्री रविना टंडन, जान्हवी कपूर, जया प्रदा, काजल अग्रवाल, प्रणिता सुभाष तसेच अभिनेते मनोज जोशी, गायक टोनी कक्कर यांनी प्रतिक्रिया दिली. यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या. हिंदू समाजाकडून या कलाकारांच्या प्रतिक्रियांचे स्वागत करण्यात आले.  मला तर कायमच प्रश्न पडायचा की सगळेच कलाकार इतके सेक्युलर, ख्रिस्ती किंवा मुस्लिम लांगुलचालन करणारे कसे आहेत? काहीजण तरी अपवादात्मक असतील की नाही? अलीकडील काळात हे अपवाद समोर आल्यामुळे समाधान वाटत आहे. राष्ट्रहित, राष्ट्रीय एकता, समरसता अशा विषयांवर काही कलाकार मुक्तपणे बोलू लागले आहेत. मागे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी अनेक कलाकारांनी आपली श्रद्धा व्यक्त केली...

लिब्रांडू जमातीची दिवास्वप्ने

इमेज
बांगलादेश, नेपाळ मध्ये हिंसक मार्गाने सत्तांतर घडवले तसे भारतातही झाले पाहिजे किंवा होईल अशी दर्पोक्ती काही जण करत असतात. त्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांसह डावे पुरोगामी लिब्रांडू सुद्धा आहेत. आता व्हेनेन्झुएला मध्ये झालेली हिंसक घडामोडी पाहता भारतात सुद्धा व्हेनेंझुएला सारखे होईल अशी भाषा होत आहे.  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुन्हा बरळले आहेत. मुळात या लोकांना भारताच्या संविधानावर विश्वास नाही, की भारताची लोकशाही संपवायची आहे तेच कळत नाही. आपल्या हातची सत्ता गेली आणि जनतेने घरी बसवले की लोकशाहीविरोधी मार्गाने सत्ता काबीज करण्याची काँग्रेसची मानसिकता नवी नाही. इंदिरा गांधींनी तेच केले होते आणि देशात आणीबाणी लादून संविधानाचा गळा घोटण्याचे पाप केले होते.  आजची काँग्रेस, डावे, पुरोगामी तेच स्वप्न पाहत आहे. परंतु खरच असे शक्य आहे का? दिल्ली दंगल असो, शाहिनबाग आंदोलन, CAA आंदोलन किंवा किसान आंदोलन असो. या आंदोलनातून देशातील सत्ता उलथवून टाकण्याचेच कारस्थान सुरू नव्हते का? पण हाती काय लागले? आज सगळी आंदोलने मागे पडली, परंतु राष्ट्रीय विचारांची सत्ता अ...

माणसाकडून पशुत्वाकडे..?

इमेज
बीबीसी मराठीचा लेख वाचला. लग्न न करता एकट्याने राहण्याचे फायदे असतात का? असे त्याचे शीर्षक आहे.  म्हणजे वाटते असे की यात विश्लेषण असेल. फायदा की तोटा? परंतु यात पूर्णपणे ejach बाजू मांडली आहे फायद्याची. म्हणजे बीबीसीला हे सांगायचे आहे की आता लोकांनी लग्न वगैरे न करता अविवाहित राहून मानवी संस्कृतीतून पशूंच्या संस्कृतीकडे(?) जावे? कुठल्या लेव्हलला भारताच्या तरुण पिढीला बरबाद करणे सुरू आहे बघा.  आजकाल अनेक तरुण तरुणी लग्नाचे विचारल्यावर नाही म्हणतात. पूर्वीही म्हणायचे. खरं म्हणजे त्या नकारामध्येच होकार असतो. काही वेळेस वेगळे ध्येय, प्लॅनिंग असू शकते. पण उशिराने का होईना लग्न सुरू आहेत.  पण लग्नच नाही करायचे, लग्न म्हणजे बंधन, लग्न म्हणजे पारतंत्र्य, लग्न म्हणजे निराशा, वाद अशी मानसिकता करण्यात आली आहे. चित्रपट, टीव्ही मालिका, रिऍलिटी शो, वेब सिरीज, आता सोशल मिडिया अशा एक ना अनेक माध्यमातून लग्नाची संकल्पना विद्रूप करण्यात आली आहे असे वाटत नाही का? कोणाच्या लग्नाची बातमी सुद्धा लिहिताना आमका व्यक्ती विवाह बंधनात अडकणार, लग्नाच्या बेडीत अडकणार असेच असते. नकळतपणे सम...

खोटा भाईचारा पुरे झाला...!

इमेज
अनेक मुस्लिम बांधवांनी गणपती बसवले. पूजा केली. त्यामध्ये अनेक कलाकार आहेत. फिल्मी अभिनेते अभिनेत्री आहेत. त्याचे स्वागतच आहे. कारण हीच आपली मूळ संस्कृती आहे. भलेही आज काळाच्या ओघात काही कारणास्तव पूजा पद्धती बदलली असेल. पण आपली राष्ट्रीय संस्कृत एकच आहे ती म्हणजे सनातन संस्कृती, हिंदू संस्कृती, भारतीय संस्कृती.  पण कोणीतरी उठतो, हातात कॅमेरा आला म्हणून काहीही दाखवतो. खोटा भाईचारा लादतो. तर समाजाला हे आवडत नाही. सोयीनुसार काही गोष्टी जर समाजावर थोपवल्या जातील तर लोक विरोध करणारच ना?  एवढाच भाईचारा आणि सामाजिक सलोखा दाखवायचा आहे तर जे मुस्लिम गणपती बसवता त्यावर शॉर्टफिल्म करा. ती वास्तविकता आहे. मुस्लिम समाजात गणपती विषयी किती श्रद्धा आहे ते दाखवा, त्याचे अनेक उदाहरण आहे. पण ते सोडायचे आणि मुस्लिम दुकानदारांची मार्केटिंग करायची आणि ती भाईचाऱ्याच्या नावाखाली खपवायची हे चाळे सुज्ञ समाज कधीच सहन करणार नाही.  कोण कुठला अथर्व सुदामे. कालपर्यंत त्याला कोणी ओळखत नव्हता. पण व्हिडिओ मधून त्याने केलेल्या स्टंटबाजी मुळे तो चर्चेचा मुद्दा बनला. फॉलोअर्स वाढवण्या...