बॉलिवूड बदलतोय..?
भारतीय सेलिब्रिटी दुटप्पी, ढोंगी असल्याची सारखी टीका होत असते. विशेषता बॉलिवूड कलाकारांवर हिंदुविरोधी, सेक्युलर असल्याची कायम टीका होते. त्यामध्ये बहुतांशी तथ्य आहेच. परंतु अलीकडील काळात काही परिवर्तन होताना दिसत आहे. देशहितासाठी आणि हिंदूंच्या बाजूने सुद्धा काही कलाकार निर्भीडपणे समोर येऊन बोलू लागले आहेत. बांग्लादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल नुकतीच अभिनेत्री रविना टंडन, जान्हवी कपूर, जया प्रदा, काजल अग्रवाल, प्रणिता सुभाष तसेच अभिनेते मनोज जोशी, गायक टोनी कक्कर यांनी प्रतिक्रिया दिली. यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या. हिंदू समाजाकडून या कलाकारांच्या प्रतिक्रियांचे स्वागत करण्यात आले. मला तर कायमच प्रश्न पडायचा की सगळेच कलाकार इतके सेक्युलर, ख्रिस्ती किंवा मुस्लिम लांगुलचालन करणारे कसे आहेत? काहीजण तरी अपवादात्मक असतील की नाही? अलीकडील काळात हे अपवाद समोर आल्यामुळे समाधान वाटत आहे. राष्ट्रहित, राष्ट्रीय एकता, समरसता अशा विषयांवर काही कलाकार मुक्तपणे बोलू लागले आहेत. मागे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी अनेक कलाकारांनी आपली श्रद्धा व्यक्त केली...