पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बॉलिवूड बदलतोय..?

इमेज
भारतीय सेलिब्रिटी दुटप्पी, ढोंगी असल्याची सारखी टीका होत असते. विशेषता बॉलिवूड कलाकारांवर हिंदुविरोधी, सेक्युलर असल्याची कायम टीका होते. त्यामध्ये बहुतांशी तथ्य आहेच. परंतु अलीकडील काळात काही परिवर्तन होताना दिसत आहे. देशहितासाठी आणि हिंदूंच्या बाजूने सुद्धा काही कलाकार निर्भीडपणे समोर येऊन बोलू लागले आहेत.  बांग्लादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल नुकतीच अभिनेत्री रविना टंडन, जान्हवी कपूर, जया प्रदा, काजल अग्रवाल, प्रणिता सुभाष तसेच अभिनेते मनोज जोशी, गायक टोनी कक्कर यांनी प्रतिक्रिया दिली. यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या. हिंदू समाजाकडून या कलाकारांच्या प्रतिक्रियांचे स्वागत करण्यात आले.  मला तर कायमच प्रश्न पडायचा की सगळेच कलाकार इतके सेक्युलर, ख्रिस्ती किंवा मुस्लिम लांगुलचालन करणारे कसे आहेत? काहीजण तरी अपवादात्मक असतील की नाही? अलीकडील काळात हे अपवाद समोर आल्यामुळे समाधान वाटत आहे. राष्ट्रहित, राष्ट्रीय एकता, समरसता अशा विषयांवर काही कलाकार मुक्तपणे बोलू लागले आहेत. मागे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी अनेक कलाकारांनी आपली श्रद्धा व्यक्त केली...

लिब्रांडू जमातीची दिवास्वप्ने

इमेज
बांगलादेश, नेपाळ मध्ये हिंसक मार्गाने सत्तांतर घडवले तसे भारतातही झाले पाहिजे किंवा होईल अशी दर्पोक्ती काही जण करत असतात. त्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांसह डावे पुरोगामी लिब्रांडू सुद्धा आहेत. आता व्हेनेन्झुएला मध्ये झालेली हिंसक घडामोडी पाहता भारतात सुद्धा व्हेनेंझुएला सारखे होईल अशी भाषा होत आहे.  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुन्हा बरळले आहेत. मुळात या लोकांना भारताच्या संविधानावर विश्वास नाही, की भारताची लोकशाही संपवायची आहे तेच कळत नाही. आपल्या हातची सत्ता गेली आणि जनतेने घरी बसवले की लोकशाहीविरोधी मार्गाने सत्ता काबीज करण्याची काँग्रेसची मानसिकता नवी नाही. इंदिरा गांधींनी तेच केले होते आणि देशात आणीबाणी लादून संविधानाचा गळा घोटण्याचे पाप केले होते.  आजची काँग्रेस, डावे, पुरोगामी तेच स्वप्न पाहत आहे. परंतु खरच असे शक्य आहे का? दिल्ली दंगल असो, शाहिनबाग आंदोलन, CAA आंदोलन किंवा किसान आंदोलन असो. या आंदोलनातून देशातील सत्ता उलथवून टाकण्याचेच कारस्थान सुरू नव्हते का? पण हाती काय लागले? आज सगळी आंदोलने मागे पडली, परंतु राष्ट्रीय विचारांची सत्ता अ...