पोस्ट्स

ऑगस्ट, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

खोटा भाईचारा पुरे झाला...!

इमेज
अनेक मुस्लिम बांधवांनी गणपती बसवले. पूजा केली. त्यामध्ये अनेक कलाकार आहेत. फिल्मी अभिनेते अभिनेत्री आहेत. त्याचे स्वागतच आहे. कारण हीच आपली मूळ संस्कृती आहे. भलेही आज काळाच्या ओघात काही कारणास्तव पूजा पद्धती बदलली असेल. पण आपली राष्ट्रीय संस्कृत एकच आहे ती म्हणजे सनातन संस्कृती, हिंदू संस्कृती, भारतीय संस्कृती.  पण कोणीतरी उठतो, हातात कॅमेरा आला म्हणून काहीही दाखवतो. खोटा भाईचारा लादतो. तर समाजाला हे आवडत नाही. सोयीनुसार काही गोष्टी जर समाजावर थोपवल्या जातील तर लोक विरोध करणारच ना?  एवढाच भाईचारा आणि सामाजिक सलोखा दाखवायचा आहे तर जे मुस्लिम गणपती बसवता त्यावर शॉर्टफिल्म करा. ती वास्तविकता आहे. मुस्लिम समाजात गणपती विषयी किती श्रद्धा आहे ते दाखवा, त्याचे अनेक उदाहरण आहे. पण ते सोडायचे आणि मुस्लिम दुकानदारांची मार्केटिंग करायची आणि ती भाईचाऱ्याच्या नावाखाली खपवायची हे चाळे सुज्ञ समाज कधीच सहन करणार नाही.  कोण कुठला अथर्व सुदामे. कालपर्यंत त्याला कोणी ओळखत नव्हता. पण व्हिडिओ मधून त्याने केलेल्या स्टंटबाजी मुळे तो चर्चेचा मुद्दा बनला. फॉलोअर्स वाढवण्या...